आज नाव वर्षांचा पहिला दिवस-चैत्र-पाडवा म्हणजेच गुढी पाडव्याचा मुहुर्ताचा आद्य सण !
जेवणात द वर्षी प्रमाणे श्रीखंड न करता काहीतरी हटके करावे असा विचार मनात आला.
म्हणून मग आजच्या सणाला , कोकणारतील रत्नागिरीच्या परांजपे आंबेवाल्यांकडून घेतलेला हापसच्या आंब्याचा रस व काल सौ.ना राम मंदिरात भजनाचे वेळी मिळालेली केळी यांचा वापर करून साजूक तुपातला प्रसादाचा शिरा केलाय.
साहित्य : सव्वा वाटी बारीक रवा, सव्वा वाटी रत्नागिरी हापूस आंब्याचा रस,सव्वा केळे, सव्वा वाटी साजूक तूप,सव्वा वाटी साखर,सव्वा वाटी दूध,केशराच्या ४-५ काड्या, ५-६ काजू पाकळ्या,५-६ बेदाणे,वेलची पूड,बारीक चमचा श्रीखंड किंवा जिलबीचा खाद्य रंग.
कृती : आगोदर मिक्सरच्या ताकाच्या भांड्यात दूध,केळ्याचे काप,आंब्याचा रस,साखर,वेलची पूड व खाद्य रंग घालून मिक्सरवर फिरवून साखर विरघळण्यासाठी बाजूला ठेवा.
आता गॅसवर एका फ्रायपॅन मध्ये साजूक तूप घालून त्यात काजू पाकळ्या व बेदाणे तळून काढा.
नंतर त्याच पॅन मध्ये आणखीन थोडेसे साजूक तूप घालून त्यात बारीक रवा घालून मंद आंचेवर झकास सोनेरी रंगावर सुवास येईपर्यंत खरपूस भाजून घ्या. भाजताननाच हळू-हळू साजूक तूप घालत रहा.
रवा छान भाजून सुवास आला की आता त्यात मिक्सरवर फिरवून घेतलेले आमरस,केळी,साखर,दूध,वेलची यांचे द्रावण टाकून झाऱ्याने हालवत रहा. आवश्यकता वाटल्यास दूध घाला.
पॅन वर एक ताट झाकून झकास वाफ काढा. रवा शिजला की गॅस बंद करा.
एका वाटीत शिरा घालून डिशमध्ये मूद काढा.
मुदीवर वर केशराच्या काड्या आणि काजूच्या पाकळ्यांनी सजावट करा.
No comments:
Post a Comment